▪️महसूल विभागाच्या दुटप्पी धोरणाबाबत संशय..ग्रामस्थांचे म्हणणे

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि. १७
अतिक्रमण हटवण्यासाठी आंबोलीत बसलेल्या साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे दरम्यान तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सायंकाळी भेट दिली मात्र ती नाममात्र होती असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यांनी पुन्हा अर्ज द्या.तसेच जमिनीत वहिवाट सिद्ध करा असे सांगून ग्रामस्थांच्या म्हणण्यापुढे मौन बाळगले.

येथील पेरीचे भाटले येथे अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या प्रकरणी त्या जमीनदोस्त करून ग्रामस्थांना मूळ वहिवाटदारांना भूमिपुत्रांना पुन्हा द्याव्यात व बाहेरच्या लोकांचे घर क्रमांक रद्द करावेत यासाठी गावठण,रमाईनगर,फौजदारवाडी येथील ग्रामस्थानी तेथे साखळी उपोषण सुरू केले आहे त्या आधी बुधवारी दि.१५ ग्रामसभेत अतिक्रमण हटवण्याचा ठराव ही घेतला होता.आज दुसऱ्यादिवशीही उपोषण सुरू आहे.दरम्यान सायंकाळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भेट दिली.त्यावेळी ग्रामस्थानी यांच्याकडे निवेदन दिले मात्र तहसीलदार पाटील यानी सर्व्हे क्रमांक घालून पुन्हा अर्ज द्या.आणि त्याठिकाणी कोणाची वहिवाट ते सिद्ध करा असे सांगितले.तसेच प्रांत आणि जिल्हाधिकारी अशी तिघांची एकत्र बैठक घेऊन ठरवणार आपल्याला निर्णय देता येणार नाही असे सांगितले.

यावेळी सदर जागा ही कबुलयातदार गावकर ही जागा महाराष्ट्र शासन लावल्याने शासनाने आपला हक्क सांगितला आहे.शासनाने ही जागा बाहेरच्या लोकाना दिली आहे काय? उच्च न्यायालयाचे आदेश हे शासनाच्या जमिनीतील अतिक्रमण हटविण्याचे आदेश आहेत. उच्च न्यायालयाचे जैसे थे आदेश २००१ साली असताना या जागेचे व्यवहार झाले कसे? गावातील लोकांना तसे जमीन ठरवून देता येत नाही असे शासनाचे पत्र आहे मात्र बाहेरच्या लोकांच्या कामांना शासनाचे अभय कसे? शासनाने मूळ वाहिवाटदारांना जमीन वाटून देण्याचे आदेश काढले असताना याठिकाणी वेगळी भूमिका कशी? असे प्रश्न ग्रामस्थानी त्यांना उपस्थित केले मात्र तहसीलदार यांनी मौन बाळगले. दरम्यान बाजारवाडी तलाठी कार्यालय येथे सर्व्हे क्रमांक ५७ मध्ये दहा जणांना नोटिसा दिल्या. त्यात ७ दिवसात अतिक्रमण हटवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. त्यामुळे याबाबत महसूल विभागाच्या दुटप्पी धोरणाबाबत संशय व्यक्त होत आहे.फक्त १० च बांधकामे अनधिकृत आहेत का? मग इतरांची बांधकामे ही महसुलाच्या आशीर्वादाने झाली आहेत का असा सवाल ग्रामस्थानी केला आहे. सध्या हिरण्यकेशी पेरीचे भाटले येथे अतिक्रमणवर अद्याप पर्यंत नोटिसा का नाही दिल्या असा सवाल उपस्थित केला आहे.

वनविभागाने अद्यापपर्यंत ७ जणांच्या इमारतीचे पंचनामे केले असून वनजमिनीत बांधकाम केल्या प्रकरणी गुन्हे नोंद केले आहेत. मात्र अध्यापपर्यंत पुढील कारवाई झाली नाही तसेच वनरक्षक पांडुरंग गाडेकर यांच्यामुळेच त्याठिकाचे अतिक्रमण झाले असल्याने त्यांची बदली करण्याचा ठरवाबाबत कार्यवाही करण्याची मागणी आहे. तर हिरण्यकेशी रस्ता येथे वनविभागाने चार वेळा मोजमापे घेऊन काय करत असल्याचे आता विचारले जात आहे.
_____________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!