II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ वेंगुर्ला | दि.१० फेब्रुवारी
खानोली (वायंगणी)दूरध्वनी केंद्रातील बंद बटेलिफोन सेवा तात्काळ सुरू करावी अन्यथा ग्राहकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणीचे अध्यक्ष सुमन कामत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रबंधक भारत संचार निगम सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले आहे.गेले दहा दिवस इंटरनेट सेवा,टेलिफोन सेवा बंद असल्याने ऑनलाइन काम करणाऱ्यांचे तळेकरवाडी येथील धान्य दुकान तसेच विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे.वरील सेवा केबल चोरीला गेल्यामुळे बंद पडली आहे. तसेच कंत्राटी कामगार संपावर असल्याने अद्याप पर्यंत टेलिफोन सेवा पूर्ववत झालेली नाही.त्यामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो.वरील सेवा तात्काळ सुरू करणे अत्यावश्यक असून सर्व बाबतीत गावचे होणारे नुकसान टाळावे अन्यथा आम्हाला सनदशील मार्गाने आंदोलन करावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे.अधिकाऱ्यांशी चर्चा करताना कंत्राटी कामगारांचा प्रश्न सुद्धा चर्चेदरम्यान आला कामगारांची वाटाघाटी चर्चा करून वरिष्ठांशी बोलून त्यांचे वेतन मिळण्यासाठी प्रयत्न करू व लवकरच तात्काळ टेलिफोन सेवा पूर्वत करण्यात येईल अशा आशयाचे लेखी पत्र हेल्प ग्रुप फाउंडेशनला दिले यावेळी कर्मचा-यांनी सुद्धा विनंतीला मान देऊन आठ दिवसात वेतन देण्याच्या अटीवर काम उद्यापासून सुरू करत असल्याचे सांगितले.यावेळी माजी सरपंच व हेल्थ ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सुमन कामत,उपाध्यक्ष हर्षद साळगावकर,सुनील नाईक,शेखर तोरस्कर उपस्थित होते.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ___________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.co⁸99}8lm/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!